शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय
केंद्र सरकारच्या म्हणण्याप्रमाणे , कृषी क्षेत्रात सुधारणा तसेच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने संसदे मध्ये १) “शेतकरी (सबलीकरण व संरक्षण) किंमती विषयक आश्वासन व शेती सेवा किंमत आश्वासन आणि शेत सेवा कायदा २०२०” , २) “शेतकऱ्यांचे उत्पादन , व्यापार आणि वाणिज्यिक ( उन्नती व सुविघा ) कायदा २०२०” , व ३) “अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा २०२०” असे तीन कायदे शेती व शेतमाल विक्री प्रक्रीयेमध्ये शेतकऱ्यांना अधिक नफा मिळविण्याच्या दृष्टीने ०५ जून २०२० पासून लागू करण्यात आलेत , जे रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. तत्वतः ह्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना खूप नफा मिळेल असा कयास करण्यात येत आहे आणि तसे म्हणणे स्वाभाविकही आहे. परंतु इतिहास बघता , या कायद्यात करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी तरतुदी प्रत्यक्षदर्शनी किती फायद्याच्या ठरणार ह्याचा अंदाज बांधणे जरा कठीण आहे. याची कारणमीमांसा केल्य...