Posts

Showing posts with the label रामरक्षा

मणिपूर चक्र आणि रामरक्षा

  मणिपूर चक्र आणि रामरक्षा--- एक अभ्यास!  हे चक्र नाभिस्थानाजवळ असते. ह्याला दहा पाकळ्या असून सत्वगुणात्मक सृष्टीचे पालन करणारा विष्णु याची अधिष्ठात्री देवता आहे. २) शरीराचा मध्य बिंदू अर्थात गुरुत्वमध्य ह्याच चक्रात असतो.  ३) ह्या चक्रावर धारणा केल्याने चित्तात सत्वगुण वाढून ते स्थिर होऊ लागते. ४) धारणा म्हणजे काय? चित्ताची स्थिरता म्हणजे धारणा... धारणा, ध्यान आणि समाधी या तीन्ही भिन्न गोष्टी आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर धारणा म्हणजे concentration... किंवा एकाग्रता ५) चित्त शरीरांतील एखाद्या भागावर स्थिर ठेवण्याचा अभ्यास करणे म्हणजे धारणेचा अभ्यास करणे होय ६) महत्त्वाचं--- एकदा आपल्याला आपल्या चक्रांचं शरीरातील स्थान माहीत झाले की त्या स्थानावर धारणा केली (त्या स्थानावर आपलं चित्त एकाग्र केलं) की त्या चक्रावर ती धारणा केली असं म्हणतात. ७) ज्या नाडीचक्रावर आपण चित्त स्थिर केलं (धारणा केली) की त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे व्यापार सुसूत्रपणे चालू लागतात. उदाहरणार्थ , आपल्या शरीरातील खालील अवयव/ग्रंथी मणिपूर चक्राच्या नियंत्...