Posts

Showing posts with the label health आरोग्य

कंबरमोडी_ आयुर्वेदीक महत्त्व

Image
  कंबरमोडी_ आयुर्वेदीक महत्त्व माझ्या बालपणीच्या अनुभवातून, साधारणतः ३-४ वर्गात असतानाची गोष्ट आहे. लहान असतांना सुट्टीच्या दिवशी आजी बरोबर शेतात जायचे आणि झाडाखालील थंड हवेत खेळत बसायचे.  असेच लहान भावाबरोबर विहीर तयार करण्याचा खेळ खेळत असतांना, अचानक भावाने हातावर विळा  मारला आणि त्यामुळे हात कापून पूर्णपणे रक्तबंबाळ झाला. मोठं मोठयाने रडणे सुरु झाले आणि लगेच आजी धावत आली. रक्त पाहून आजीने लगेच जवळचा कंबरमोडीचा पाला तोंडला व त्याला थोडे बारीक करून जखमेवर बांधून दिले. आणि साधारणतः २-३ दिवसाचे आत घाव भरून आला व जखम पूर्णपणे बारी झाली. कोणत्याही डॉक्टर कडे जायची गरज  भासली नाही. ही होती कंबरमोडीच्या अर्काची कमाल. मित्रांनो हि कंबरमोडी आपल्या आजूबाजूला, शेतात, भारतातील कुठल्याही भागात बघायला मिळते. आपण बरेचदा शेतात काम करतांना, किंव्हा घरी काम करतांना काही धारदार अवजार लागल्याने जखम होत असते. त्यावेळेस नक्कीच तुम्हाला याचा वापर करून घरगुती उपायाने जखम भरून काढता येईल.  कधी वापर केला तर अनुभव जरूर सांगा.  धन्यवाद...   याबरोबरच वैध साहेबांचे अनुभव खाल...

खोकला - घरगुती उपचार

खोकला - घरगुती उपचार  ज्यांना खुप जास्त खोकला येत असेल औषधांनी तेवढ्यापुरता थांबुन परत - परत तोच त्रास होत त्यांनी हा उपाय करायला हरकत नाही गुण येईल.  अगदी थोडी हळद पावडर तोंडाच्या एकदम आत मध्ये जे छोटेसे मांसाचे लोलक असते त्यास लावावी, चटकवावी. हाताने शक्य नसेल तर छोट्या चमचीस तुप लावुन त्या चमचीस हळद पावडर लावा व त्याने केले तरी चालते, दिवसातून तीन तार वेळेस लावले तर उत्तम, लाभ त्वरीत होतो.  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

कोमट पाणी पिण्याचे फायदे

 कोमट पाणी पिण्याचे फायदे, बरेच रोग होतात दूर  सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घाण साफ होते. कोमट पाणी पिण्यामुळे, शरीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते. जाणून घ्या फायदे. आपले शरीर बहुतांश पाण्याने बनलेले आहे. जर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर बरेच रोग शरीरात घर करू लागतात, याचाच अर्थ पाणी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. कोमट पाणी एक औषध म्हणून कार्य करते. बहुतेक लोक दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करतात, जेणेकरून शरीराला ताजेतवाने वाटेल. त्याच वेळी, पाणी पिताना, सामान्य किंवा थंड पाणी पितात. आयुर्वेदानुसार हे चुकीचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सर्दी पडश्यात लाभदायक सर्दी झाल्यावर कोमट पाणी पिण्याने कफ वितळतो. दिवसातून तीन किंवा चार वेळा कोमट पाणी घेतल्यास थंडीत आराम मिळेल. कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्याने देखील खोकला बरा होऊ शकतो. कोमट पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्याचा व...

आपटा - अत्यंत बहुगुणी औषधी वनस्पती

 दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही आपट्याची पाने किती गुणकारी आहेत, याची माहिती करुन घेऊया. आपटा ही एक अत्यंत बहुगुणी औषधी वनस्पती असून या झाडाची पाने, शेंगांच्या बिया, फुले, साल औषध म्हणून वापरली जाते. आपट्याच्या सालीपासून दोरखंडही बनवले जातात. तसेच आपट्याच्या झाडापासून डिंकही मिळतो. आपट्याला ' अश्मंतक ' म्हणूनही ओळखले जाते. 'अश्मंतक' म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. अशा या आपट्याची मुळे जमिनीत खोलवर रुजतात. ही मुळे खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक फुटतात. त्यामुळे खडकाळ, उघड्या टेकड्यांवर हमखास आपट्याच्या झाडाची लागवड केली जाते. तसेच ' अश्मंतक ' याचा दुसरा अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा. धन्वंतरीने 'निघण्टू'मध्ये आपट्याच्या झाडाचे आणखी औषधी उपयोग विशद केले आहेत.    अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण ।   इष्टानां दर्शनं देही कुरू शत्रुविनाशनम् ॥  या श्लोकानुसार, आपट्याचे झाड हे महावृक्ष असून ते अनेक महादोषांच्या निवारणाचे काम करते. इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो. अशाप्रकारे पुराणांमध्ये आणि आयुर्वेदातही आप...

तेजोवलय- Positive Energy

 तेजोवलय  आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी  रोजच्या रोज शुद्ध ठेऊ शकतो.   1 . मीठाचा वापर  हा फार छान त्वरित results देणारा उपाय आहे. बाजारात खडा मीठ (sea salt) मिळतं.  अतिशय स्वस्त असतं आणि सहज उपलब्ध आहे. नाहीच मिळालं तर साधं मिठ सुधा चालेल.  मिठामधे नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची मोठी शक्ती आहे.  घरात खूप कलह, वादविवाद चाललेत, आजारपणं संपत नाहीयेत, नकारात्मकता जाणवतेय, अडचणी येतायत, किंवा यापैकी काहीही नसल्यास प्रतिबंधात्मक म्हणून रोज सुद्धा.. हे मीठ काचेच्या छोट्या छोट्या बाऊल्स मधे भरून घरात/ ऑफिसमधे प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. आजारी माणसाच्या उशाशी, पायाशी ठेवा. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मिठाला लगेच पाणी सुटेल, ते काळं पडेल, किंवा खराब होईल. आशा वेळेस ते इतरत्र कुठेही न सांडवता टॉयलेट मधे टाकून द्या. कमीतकमी 3 महिने हा उपाय सतत करत राहावा. मिठाच्या पाण्याने रोज लादी ही पुसू शकता. जेव्हा कधी खूप depress किंवा अकारण उदास, दुःखी, एकटेपणा, भीती, किंवा कसलं वाईट वाटत असेल त्या वेळेस दोन्ही मुठीं मधे खडा मीठ घ्या, आणि दोन्ही पाय साधारण ग...