Posts

Showing posts with the label औरंगाबाद

गोळेगाव - ग्राम विकासाचे अद्भुत मॉडेल

Image
गोळेगाव - ग्राम विकासाचे अद्भुत मॉडेल  (सरपंचाच्या खुर्चीवर सावित्रीबाई आणि भारताचे संविधान) वरील फोटोवरून आपल्याला अंदाज आला असेलच की, या गावातील लोकनेत्यांमध्ये खरच काहीतरी वेगळेपण आहे, ज्यामुळे हे गाव एक ग्राम-विकासाचे एक वेगळे मॉडेल म्हणून उदयास येऊ शकले. वरील फोटोमधील खुर्ची हि गोळेगाव येथील सरपंचांची आहे, ज्यावर ते कधीच बसले नाहीत तर, त्यावर आदर्श म्हणून सावित्रीमाता फुले आणि जगातील अनमोल ग्रंथ भारताचे संविधान ठेवलेले आहे. जे दररोज गावातील लोकनेत्यांना आणि गावकर्यांना गावाच्या विकासाकरिता निरंतर कार्य करण्याकरिता प्रेरणा देत असते. गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि समाज कार्यात अग्रेसर श्री. सुनील चव्हाण आणि सुभाष चव्हाण यांच्या कृपेने गोळेगाव बघण्याचा योगायोग आला. गोळेगाव हे औरंगाबाद जिल्यातील खुलताबाद तालुक्यात, साधारणतः ४७७ परिवार असलेले २४५९ लोकसंखेचे गाव आहे.  २० वर्षापासून गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावाचा विकास करून गावाला स्वयंपूर्ण करायला निश्चय केला होता आणि आज हो निश्चय त्यांनी पूर्णत्वास नेल्याचे दिसून येते. असा निश्चय करण्यास कारण ठरले, ते एका १३-१४ वर्ष वयाच्य...