Posts

Showing posts with the label जलसंजीवनी - एक दिव्य औषध

जलसंजीवनी - एक दिव्य औषध* .

 जलसंजीवनी - एक दिव्य औषध* . पाणी हे एक दिव्य अद्भुत औषध आहे.  बेशुद्धाला शुद्धीवर आणण्यासाठी पाणी. अंतिम समयी पाणी. तहान लागली की पाणी. काही सुचत नसले की पाणी. हात पाय धुवायला पाणी. आंघोळीसाठी सप्त नद्यांचे पाणी. बाहेरून आलेल्याचे स्वागत करायला पाणी. अन्न शिजवायला पाणी प्रोक्षण करण्यासाठी पाणी कपडे धुवायला पाणी. भांडी घासायला पाणी. शरीर अवयव स्वच्छ करायला पाणीच. मल मूत्र विसर्जनानंतर पाणी. औषधं, गोळ्या घ्यायला पाणी.  शाप देण्यासाठी अभिमंत्रण करण्यासाठी किंवा आशीर्वाद देण्यासाठी फक्त पाणीच वापरले जाते. प्रकुपित झालेला अग्नि, अग्नीचा दाह कमी करायला पाणी !  शरीर आणि मन यांच्या अंतर्बाह्य शांततेसाठी पाणीच.  थकलेल्या जीवाला पाणी. घाबरलेल्या जीवाला पाणी. दमलेल्या जीवाला पाणी जिथे पाणी हवे तिथे पाणीच !  दुसरं काहीही चालत नाही. माणसं चंद्रावर, मंगळावर चालली आहेत. का कशासाठी?  पाणीच शोधायला.  कारण पाणी हेच जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. देवाच्या अभिषेकाचे पाणी तीर्थ म्हणून आपण प्राशन करतो. आचमन करताना तीन पळ्या पाणीच. आणि जेवण संपल्यावर एक पळीभर प...