Posts

Showing posts with the label घरगुती उपचार

आवळा आयुर्वेदिक महत्त्व

 आवळा आयुर्वेदिक महत्त्व   नीसर्गाने कीती सुंदर वनस्पती आसपास दिल्या .त्यातीलच आवळा हा आवर्जून सांगांव लागेल .रोग होउ नये यासाठी उपाययोजना करण्यात आवळा महत्त्वाचा आहे. व्हायरल आजार संसर्गजन्य आजार रोखण्यात आवळ्यासारख औषध नाही. आयुर्वेदात त्रीफला खुप महत्व आहे( बेहडा हीरडा आवळा )हे तीनही वात पीत्त कफ नाडी संतुलीत ठेवतात .अगदि डोळ्यापासुन सर्व अवयव छान ठेवन्यात यांचा वाटा अप्रतीम आहे. इं . - Emblic myroblan एंब्लिक मिरोब्लन . लॅ . - Phylanthus amblica  भरतखंडांत आंवळीची झाडे पुष्कळ ठिकाणी होतात . हे झाड बरेंच उंच असते . याची पानें शमीच्या पानांसारखी असतात . आंवळीस कार्तिकमासी आंवळे येतात . हे फळ साधारण सुपारीएवढे असते . आंवळ्यांत दोन जाती आहेत . रान - आंवळा व पांढरा आंवळा .  आंवळ्याचा मुरंबा करितात . तो पित्तावर चांगला आहे . त्याचे लोणचे होते .   आंवळे सुकविले म्हणजे याची आंवळकठी होते .  आंवळीच्या लांकडापासून पांढरा कात होतो .  आंवळकठी वाटून अंगास लावतात . आंवळकठीचे रायतें होतें . वैद्यकांत ज्यास त्रिफळा म्हणतात त्यांत आंवळकठी येते . हिरडा , बेहडा ,...

कडुलिंबाचाजीवन रस- घरगुती उपचार

 घरगुती उपचार  आपल्या सर्वांना माहित असेल असा सरळ व सोपा उपाय, म्हणजे कडुलिंब.. होय मित्रांनो ज्यांना पण अंगात खाज येणे, त्वचारोग, जळजळ होणे, पोटदुखणे, ताप येणे, पित्त होणे, डोके दुखणे, शुगर असणे, पोटात जंत असणे... असे अनेक आजारावर एक रामबाण घरगुती औषध - कडुलिंब होय.  रोज सकाळी एकदा कडुलिंबाचा ताजा व स्वच्छ पाला धुऊन घ्या, साधारण एक चहाचा कप होईल इतका, मिक्सर मध्ये थोडे पाणि व पाला टाकुन ज्युस करा व कपामध्ये गाळून घ्या व त्यावर अगदी थोडे मीठ टाकुन ते पिऊन घ्या, ( यावर पाणि साखर वगैरे घेऊ नये ) त्यानंतर १ तास काही घेऊ नये, फक्त ५ ते ६ दिवस नियमित घ्या, त्यानंतर गरज असल्यास १५ दिवसानंतर परत हाच प्रयोग करावा. सलग १५ दिवस घेऊ नये, त्याचे काही वयोमर्यादेनुसार नियम असतात. *५ ते ६ दिवस सर्वांसाठी चालेल .*   वैद्य विश्राम माळकोळीकर ,  श्रीराम आयुर्वेदिक   7350911888,9420242484  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼