भोजनातील हानिकारक संयोग
भोजनातील हानिकारक संयोग दुधा सोबत दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु, हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधा सोबत हानिकारक आहेत. दह्या सोबत खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये. तुपा सोबत थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते. मधा सोबत मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात. फणसा नंतर पान खाणे हानिकारक असते. मुळ्या सोबत गुळ खाणे नुकसान दायक असते. खीरी सोबत खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये. गरम पाण्याबरोबर मध घेऊ नये थंड पाण्याबरोबर शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गर्म भोजन घेऊ नये. कलिंगडा बरोबर पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये. चहा सोबत काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये. माशा सोबत दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये. मांसा बरोबर मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते. गरम जेवणा बरोबर थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात. खरबुजा बरोबर लसूण, मुळा, मुळ...