Posts

Showing posts with the label वरण भात

वरण भाताचे आयुर्वेदिक महत्त्व

वरण भाताचे आयुर्वेदिक महत्त्व प्रिय मैत्रजनहो,  वरणभात ही पाककृती आपण वर्षानुवर्षे करत/ खात आलो आहोत.मग आज विशेष काय ? मलाही आधी हाच प्रश्न पडला होता.. आहार हा अत्यावश्यक.मात्र तोंडाची चव गेली असेल.प्रचंड अशक्तपणा आला असेल.  अनुभव share करतोय, मी रुग्णाला प्रेशर कुकरमधलं अन्न त्यांना देऊ नका असं सांगितलं .जो काही वरणभात खायचा आहे तो थेट अग्निप्रक्रिया केलेला द्या.हवेशी अन्नाचा संपर्क येऊद्या असं सांगितलं. वास्तविक समजायला लागल्यापासून प्रेशरकुकर हा घरातला अटळ घटक आहे..त्याचे फक्त फायदेच आहेत अशीच सर्वांची अजूनही रास्त समजूत . रूग्णांसाठीचा भात करण्यासाठी तांदूळाच्या चौपट पाणी घालून थेट गॕसवर उकळत ठेवा.तोपर्यंत गावठी तांदूळ किंवा चांगल्या प्रतिचे कोणतेहि तांदूळ धुवून निथळत ठेवा. पाण्याला आधण आल्यावर त्यात तांदूळ टाका.तांदूळ बोटचेपे शिजल्यावर वरची जास्तीची निवळ बाजूला काढा.गॕस बारीक करून लोखंडी तवा ठेवून तो शिजत आलेला भात वाफ यायला ठेवा.दणदणीत वाफ आल्यावर भात मऊ लुसलुशीत आणि तरीही मोकळा होईल. भाताची निवळ हिंग मीठ तूप घालून रूग्नाला पिण्यासाठी द्या. वरणासाठीची अर्धी तूर डाळ आणि अ...