वातदोष
वर्षा ऋतूच्या काळात- 1.अग्नि मंद झालेला असतो, 2.शरीरात वातदोषाचा प्रकोप झालेला असतो , 3 शरीराची प्रतिकारक्षमता कमी झालेली असते . हे तीन मुद्दे एव्हाना तुम्हाला पाठ झालेचं असतील त्यात सध्याच्या कोरोना साथीमुळे , सगळ्यांचा मानसिक तणावही खूप वाढलेला आहे ,त्यामुळे आधीच उणावलेली प्रतिकारशक्ती अजून खालावते. अशा कसोटीच्या काळात आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी , प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी ,नेहमीच्या दिनक्रमात ,घरच्याघरी करता येण्यासारखे, अतिशय परिणामकारक पण साधे-सोपे उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, आता त्याची थोडक्यात माहिती करून घेऊया व हे उपचार शक्य तेवढे आचारणातही आणूया . कारण हे सर्व केवळ लेखाचे विषय नसून, प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या गोष्टी आहेत. म्हटलेले आहेचं ना की, एकतरी ओवी अनुभवावी. अभ्यंग व उद्वर्तन- अभ्यंग म्हणजे सर्व शरीराला तेलाने मालिश करणे . अभ्यंगाची सुरवात खरतरं साधारण दिवळीपासून करावी, पण वर्षा काळात होणारा वातप्रकोप लक्षात घेता, आठवड्यातून एक वेळा , सकाळी उपाशीपोटी, तिळाचे तेल ,नार...