Posts

Showing posts with the label घरगुती

रक्तचंदनाचे फायदे

 रक्तचंदन  ------------------  “रक्त चंदन” म्हणजे नेमके काय ?   काय आहेत त्याचे फायदे?  ” रक्त चंदन ” म्हटले की बहुतेक जणांना  चंदनाचाच प्रकार असावा, असे वाटते. परंतु खूप कमी लोकांना याची माहिती असल्याने येथे आवर्जून त्याची माहिती द्यावीशी वाटते…   सफेद चंदनाचे फेस पॅक, अगरबत्ती , किंवा औषधी गुणधर्म सर्वानाच परिचित आहेत. परंतु रक्त चंदन आणि सफेद चंदन यात जमीन असमानाचा फरक आहे. तो कसा ते आपण जाणून घेऊयात… रक्त चांदनाला वैज्ञानिक भाषेत टेरोकार्पस सेंटनांस असेही संबोधले जाते. मुळात रक्त चंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रव पदार्थ असतो, त्यामुळेच या झाडाला “रक्त चंदन” असे म्हटले आहे. या झाडाचे वाळलेले लाकुडही लाल रंगाचेच असते.  चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे पण या चंदनाप्रमाणे रक्त चंदनाच्या झाडाला मुळीच सुगंध येत नाही.  रक्तचंदनाचे लाकूड लाल रंगाचे असल्यामुळे हा वृक्ष मौल्यवान मानला जातो. रक्तचंदन वृक्ष सु. ८ मी. पर्यंत उंच वाढतो. तो कमी मातीच्या जमिनीत वाढत असून त्याची वाढ जलद होते. तीन वर्षांत सु. ५ मी.पर्यंत त्याची उंची वाढते. त्याचे खो...

तेजोवलय- Positive Energy

 तेजोवलय  आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी  रोजच्या रोज शुद्ध ठेऊ शकतो.   1 . मीठाचा वापर  हा फार छान त्वरित results देणारा उपाय आहे. बाजारात खडा मीठ (sea salt) मिळतं.  अतिशय स्वस्त असतं आणि सहज उपलब्ध आहे. नाहीच मिळालं तर साधं मिठ सुधा चालेल.  मिठामधे नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची मोठी शक्ती आहे.  घरात खूप कलह, वादविवाद चाललेत, आजारपणं संपत नाहीयेत, नकारात्मकता जाणवतेय, अडचणी येतायत, किंवा यापैकी काहीही नसल्यास प्रतिबंधात्मक म्हणून रोज सुद्धा.. हे मीठ काचेच्या छोट्या छोट्या बाऊल्स मधे भरून घरात/ ऑफिसमधे प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. आजारी माणसाच्या उशाशी, पायाशी ठेवा. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मिठाला लगेच पाणी सुटेल, ते काळं पडेल, किंवा खराब होईल. आशा वेळेस ते इतरत्र कुठेही न सांडवता टॉयलेट मधे टाकून द्या. कमीतकमी 3 महिने हा उपाय सतत करत राहावा. मिठाच्या पाण्याने रोज लादी ही पुसू शकता. जेव्हा कधी खूप depress किंवा अकारण उदास, दुःखी, एकटेपणा, भीती, किंवा कसलं वाईट वाटत असेल त्या वेळेस दोन्ही मुठीं मधे खडा मीठ घ्या, आणि दोन्ही पाय साधारण ग...

आयुर्वेद समज/गैरसमज

 आयुर्वेद समज/गैरसमज  1) रोज सकाळी उठल्यावर गार पाणी ,साधे पाणी  कोमट पाणी ,लिंबू पाणी,गरम पाणी मध लिंबू,पंचामृत असे पिल्यास शरीर शुद्ध होते आणि अनेक छोटे मोठे त्रास कमी होतात असे कुठे ही आयुर्वेदात म्हणलेले नाही.. 2)गरम पाणी आणि मध एकत्र करू नये. 3)आयुर्वेदात शाम्पू,conditionar,साबण,फेस पॅक बनवण्याची कृती लिहिलेली नाही. 4) कडधान्ये खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते हा अजून एक गैरसमज आहे. 5)एका आठवड्यात ३ पंचकर्म असे आयुर्वेद सांगत नाही 6)रोज ३,४ लिटर पाणी पिल्यास बाथरूम धुतल्याप्रमाने किडन्या पण धुतल्या जातात..हे आयुर्वेद सांगत नाही. 7)तहान लागेल तेवढेच पाणी प्यावे..जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावे. 8)आयुर्वेदात बिस्किटांची कृती नाही. आयुर्वेदीक बिस्किटे असा प्रकार अस्तित्वात नाही.ते एक निव्वळ थोतांड आहे  9)स्पा आणि wellness center म्हणजे आयुर्वेद नव्हे. 10)मासिक पाळी च्या वेळी लोणच्याला हात लावू नये ..लोणचे खराब होते हा अजून एक गैर समज आहे. 11) कोणत्याही वस्तूच्या मागे किंवा पुढे आयुर्वेद शब्द जोडला की वस्तू विकण्यास सोपी होते.हा केवळ मार्केटिंग चा फंडा आहे...आयुर...

आयुर्वेद हेंल्थ टीप्स

आयुर्वेद हेंल्थ टीप्स १) तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावे. २) जास्तीचे पाणी पिल्यास kidney वर लोड येतो. ३) उपवास करू नयेत. शाबुदाना,शेंगदाणे,वरी हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ आहेत. ४) जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे. ५)दोन्ही जेवणानंतर शत पावली घालावी म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते. ६)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत. ७)रात्री च्या वेळी दही खाऊ नये. ८)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. ९) मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे...फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत. ८) आपण जिथे राहतो तिथे कोणत्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे.. ९) रोज रिकाम्या पोटी ३ ते १२ सूर्य नमस्कार घालावेत. १०)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश असावा. ११)दिवसा झोपू नये. १२)गरम पाणी आणि मध एकत्र करू नये..मधाचे अपचन होते..साधे पाणी आणि मध एकत्र करून पिण्यास हरकत नाही. १३) संडास,लघवी ,उलटी या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे. १४)पाळीच्य...

प्लेटलेट्स म्हणजे काय? प्लेटलेट्स कसे वाढवायचे ?

Image
  प्लेटलेट्स म्हणजे काय? प्लेटलेट्स कसे वाढवायचे ?  ‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’⚡ हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.  हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात. या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे. रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.* लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते. प्लेटलेट्स या मोठया हाडांतील रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात. ⚡ प्लेटलेट्सचं कार्य⚡ रक्तवाहिन्यांतून वाह...

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी १० घरगुती उपाय

 मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी  १० घरगुती उपाय               मासिक पाळी नियमित असणे आरोग्यासाठी योग्य असतं. अनेक स्त्रियांची पाळी येण्याची वेळ निश्चित नसते त्यामुळे अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. अनेकांना कधी कधी पाळी लवकर येते तर कधी उशिरा तर कधी-कधी दोन-तीन महिने उलटले तरी येतच नाही. पाळीवेळेवर येणे निरोगी असण्याचे लक्षणे असतात.         पाळीचे चक्र 21 किंवा 35 दिवसाचे असते. अश्यावर जर पाळी वेळेत यावी असं वाटत असेल तर येथे  आम्ही काही उपाय सांगत आहोत. १) आलं    आल्याचा चहा प्यायल्याने पाळी लवकर येते. पूर्वीच्या काळी बायका पाळी आणण्यासाठी आल्याचा वापर करत असे. हे उपयोगी असते. २) हळद     दुधात हळद टाकून घेतल्यास पाळी लवकर येण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी आणि अजून ही पारंपरिक उपचार साठी हळदीचा वापर केला जातो. हळदी चे गुणधर्म औषधी असतात. हळद उष्ण प्रकृतीची असते. ३) ओवा आणि गूळ     ओवा आणि गुळाचे सेवन केल्याने मासिक पाळी लवकर येते. रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा आणि गूळ टाका आणि ते पाणी...

बद्धकोष्ठतेच्या समस्येची काही कारणे आणि उपाय

 बद्धकोष्ठतेच्या समस्येसाठी काही कारणे आणि उपाय  आपले पोट नेहमी साफ आणि चांगले असणे खूप महत्वाचे आहे. आपले पोट साफ नसेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा बद्‍धकोष्ठताची समस्या निर्माण होते. किंवा तिला आमंत्रण मिळते. बद्‍धकोष्ठतेतून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर त्यातून तुमची सुटका होते. ही समस्या सहजपणे दूर केली जाऊ शकते. त्यासाठी खालील गोष्टी करणे गरजेचे आहे. बद्‍धकोष्ठता होण्याचे मुख्य कारण 1. पाणी  कमी प्यायल्यामुळे बद्‍धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. 2.  जास्त तेल आणि मसाल्यांचे पदार्थ सेवन केल्याने या समस्येला आमंत्रण मिळते. तसेच पोटाचे अन्य आजार उद्धभवतात. 3. सतत एकाच ठिकाणी बसून राहिल्याने बद्‍धकोष्ठता या सारखी समस्या निर्माण होते. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना या समस्येचा जास्त सामना करावा लागतो.  4. वजन कमी करण्यासाठी कमी खाणे हे देखील बद्‍धकोष्ठतेचे कारण आहे. त्यामुळे संतुलित प्रमाणात आहार घेणे आवश्यक आहे. 5. पोट दुखी होत असेल तर पेन किलर टॅबलेट घेणे टाळा. पेन किलरचा जास्त ...

अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Image
  अंजीर खाण्याचे  आरोग्यदायी  फायदे                 अंजीर मध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. ताज्या अंजीराच्या सेवनानं पोषक घटक जास्त प्रमाणात मिळतात, तर सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.    अंजीर खाण्याचे फायदे : १) अंजीर पित्त विकार, रक्त विकार, वात व कफ विकार दूर करणारे आहे. ताज्या अंजीरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात, तर सुक्या अंजीरामध्ये अनेक प्रकाराचे उपयोगी क्षार आणि जीवनसत्त्वे असतात. २) अंजीरात लोह घटक अधिक असतो. यामुळे आमाशय जास्त क्रियाशील बनते; त्यामुळे भूक फार लागते म्हणूनच रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) या आजारामध्ये अंजीर सेवन करावे. अंजीरामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत राहण्य...