कृषी हा व्यवसाय समजावा- Treat Agriculture as a Business
कृषी हा व्यवसाय समजावा- Treat Agriculture as a Business बऱ्याच महिन्यानंतर मागील आठवड्यात फिल्ड मध्ये जाण्याचा योग आला आणि बऱ्याच शेतकरी मित्रांबरोबर चर्चा करण्याचा झाली. सहज शेतामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या एका शेतकरी मित्राने विचारले कि, शेतकरी शेती योग्य रीतीने करीत नाही व आजकाल शेती परवडणारी राहिली नाही. याचे नेमके कारण काय असावे ?? असा प्रश्न विचारून त्यांनी त्यांच्या अंदाजाने सांगितले कि, असे असण्यामागचे कारण कदाचीत असे असावे कि, शेतकरी अनपड/ अडाणी आहे, किंव्हा शेतकरी आळसी आहे, त्यामुळे त्याला कितीही शिकविले किंव्हा माहिती असली तरी आळसीपणामुळे व्यवस्तीत शेती करीत नाही. त्या शेतकऱ्याचा प्रश्न आणि त्याचे अंदाज हे त्यांच्या विचारांनी बरोबर आहेत, किंबहुना भारतातील बऱ्याच लोकांचा हाच समाज आहे (खासकरून पांढरपेशी लोकांचा) कि, भारतातील शेतकरी अडाणी व आळसी आहे. परंतु हे खरे असेल काय ?? हा प्रश्न कायम राहतो.... मग वरीलप्रमाणे विचार केल्यास, १) शेतकरी जर अडाणी असता तर, भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतीचे उत्पादन होते. किंबहुना बऱ्याच पिकांमध्ये आपला भारत देश जगात नं...