वातप्रकोपाची लक्षणे

 वातप्रकोपाची लक्षणे 

* सांधा निखळणे किंवा गर्भाशयासारखा अवयव खाली घसरणे .

* एखाद्या अवयवाचा आकार वाढणे उदा. पायाच्या शिरा फुलणे .

* हात ,पाय ,सुन्न होणे .

* कोणत्याही प्रकारची वेदना उदा. ठणकने, सुई टोचल्याप्रमाणे दुखणे, त्रिशूल भोसकल्याप्रमाणे दुखणे, पिरगाळले गेल्याप्रमाणे दुखणे वगैरे सर्व प्रकारच्या वेदना होणे.

* खांदा ,पाठ , मान वगैरे अवयव जखडून जाणे.

* कारण नसतानाअंगावर काटा येणे.

* थरथर, कंप सुरू होणे.

* त्वचा, डोळे, तोंड, योनी वगैरे अवयवांच्या ठिकाणी कोरडेपणा जाणवणे.

* डोळा फडफडणे किंवा शरीरावर इतरत्रही आंतून स्पंदन जाणवणे. 

* त्वचा काळसर , कोरडी व निस्तेज होणे.

* हाडे ठिसूळ होणे.

* शरीर शुष्क होणे, वजन कमी होणे. * आवाज कर्कश होणे.

* मन अतिशय चंचल व अस्वस्थ होणे.

* झोप न येणे.

* थकवा जाणवणे व त्यामुळे काम करण्यास उत्साह न वाटणे.

* मलप्रवृत्ती कडक होणे,पोटात वायू धरणे .

* गरम तापमानाच्या गोष्टी खाण्याची इच्छा होणे .


 अशी लक्षणे दिसत असल्यास वात वाढलेला आहे असे समजावे . 


 याऊलट वात प्रमाणापेक्षा कमी झाला तर, 

  

* शारीरिक हालचाली मंदावतात. 

* बोलायची इच्छा होत नाही. 

* काहीच आवडेनासे होते, म्लानता येते.

* इंद्रियांची ज्ञानग्रहण करण्याची शक्ती मंदावते .


वाताचे नानात्मज 80 विकार सांगितले आहेत. वातदोष जसा सर्वापेक्षा जास्त कार्य करतो तसा सर्वाधिक रोगही तयार करतो. वाताचे काही महत्वाचे नानात्मज विकार खालील प्रमाणे आहेत,


 * आक्षेपक* ( झटके येणे )

* पक्षाघात ( अर्धांगवायू )

* अर्दित ( चेहऱ्याचा अर्धा भाग वाकडा होणे )

*  सायटिका 

* कटिग्रह ( कंबर जखडणे )

* निद्रानाश 

* मिन्मिनत्व ( अस्पष्ट व अडखळत बोलणे ).


वातज विकार वातप्रकृती असणाऱ्या व्यक्तींना सहज होऊ शकतात व 

वातप्रकोप खालील कारणांनी होऊ शकतो .


* कडू , तुरट व तिखट पदार्थ तसेच थंड वीर्याचे व तापमानाचे पदार्थ अतिप्रमाणात खाणे . हेल्थफूडच्या  नावाखाली आज-काल कारल्याचा रस , कडूनिंबाचा रस प्यायला दिला जातो याचाही अंतर्भाव यात होतो. 

* कोरडे, नि:सत्व पदार्थाचे सेवन करणे .

* वाळवलेले पदार्थ उदा.वाळवलेल्या भाज्या, सुकवलेले मासे, पापड वगैरे पदार्थाचे सेवन करणे.

* चना, वाटाणा, पावटा, चवळी, छोले, मटार वगैरे कडधान्यांचे सेवन करणे.

* उपवास करणे किंवा कमी प्रमाणात खाणे .

* शरीरशक्‍तीपेक्षा अधिक व्यायाम  करणे किंवा परिश्रम करणे.

 * जोराजोरात बोलणे तसेच सतत बोलणे.

* उंचावरून खाली पडणे, अपघात होणे.

* खूप प्रवास करणे, दुचाकी, गाडी, रिक्षा, बस, विमान अशा कोणत्याही वाहनातून दीर्घकाळ प्रवास करणे.

* रात्री जागरण करणे.

* मल ,मूत्र , वायू , उलटी वगैरे वेग आले असता जबरदस्तीने.अडवून धरणे.

* सतत चिंताग्रस्त राहणे, भय , शोक, उद्वेग, क्रोध यांचा अतिरेक होण्यानेही  वातप्रकोप होऊ शकतो.


 पुढील भागात आपण वातदोषावरचे सामान्य उपचार पाहू या.. 


संधर्भ-

 वैद्य विश्राम माळाकोळीकर, 

 श्रीराम आयुर्वेदिक 

 7350911888 9420242484 

निरोगी रहा, आनंदी रहा !!

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय