Posts

कोमट पाणी पिण्याचे फायदे

 कोमट पाणी पिण्याचे फायदे, बरेच रोग होतात दूर  सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घाण साफ होते. कोमट पाणी पिण्यामुळे, शरीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते. जाणून घ्या फायदे. आपले शरीर बहुतांश पाण्याने बनलेले आहे. जर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर बरेच रोग शरीरात घर करू लागतात, याचाच अर्थ पाणी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. कोमट पाणी एक औषध म्हणून कार्य करते. बहुतेक लोक दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करतात, जेणेकरून शरीराला ताजेतवाने वाटेल. त्याच वेळी, पाणी पिताना, सामान्य किंवा थंड पाणी पितात. आयुर्वेदानुसार हे चुकीचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सर्दी पडश्यात लाभदायक सर्दी झाल्यावर कोमट पाणी पिण्याने कफ वितळतो. दिवसातून तीन किंवा चार वेळा कोमट पाणी घेतल्यास थंडीत आराम मिळेल. कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्याने देखील खोकला बरा होऊ शकतो. कोमट पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्याचा व...

खोकला घरगुती उपाय

 घरगुती उपचार  खोकला  ज्यांना खुप जास्त खोकला येत असेल औषधांनी तेवढ्यापुरता थांबुन परत - परत तोच त्रास होत त्यांनी हा उपाय करायला हरकत नाही गुण येईल.  अगदी थोडी हळद पावडर तोंडाच्या एकदम आत मध्ये जे छोटेसे मांसाचे लोलक असते त्यास लावावी, चटकवावी. हाताने शक्य नसेल तर छोट्या चमचीस तुप लावुन त्या चमचीस हळद पावडर लावा व त्याने केले तरी चालते, दिवसातून तीन तार वेळेस लावले तर उत्तम, लाभ त्वरीत होतो.  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

चहा

 चहा ☕ मग सकाळी उठल्यावर चहा प्यावा की नाही ?   अगदी सकाळी उठल्यावर तोडं धुतले की  लगेचच चहाची गरजही नसतेच !  वास्तविक रिकाम्यापोटी घेतलेला चहा  हा काही वेळाने लागणार्या भूकेलाही नाहीशी करतो.  म्हणजेच चहा प्यायचा टाळला  तर नाष्ट्याची भूक कडकडून लागते.  हा अनुभव प्रत्येकाने घेतला तरच कळतो…  चहा न घेता तसेच राहीले असता..  पित्ताचा काळ हा सकाळी १० ते दुपारी २ असल्याने  ह्या काळात चांगली भूक लागते.  चहा हे पेय शीतप्रदेशाचे पेय आहे.  थंड प्रदेशात गारठा कमी व्हावा म्हणून  चहा/कॉफी पाना ची पद्धती आहे.  ▪ आपल्याकडे फारतर पावसाळ्यात व हिवाळ्यात चहा/कॉफी प्यायला हरकत नाही परंतु तो गोदुग्ध युक्त असावा.  ▪अति तुरट किंवा कडू रसात्मक असा नसावा.  ▪परंतु जे पित्तज प्रकृती आहेत, ज्यांना पित्ताचे विकार संभवतात त्यांनी चहा शक्यतो अतिप्रमाणात टाळावा.  त्यांना ऐवजी गोदुग्ध + गोघॄत (गाईचे तूप) + साखर घ्यायला हवे. ▪ चहा बनवताना त्यात सुंठ व वेलची पावडर टाकावी म्हणजे पचनास मदत होते,  पित्त वाढत नाही व इंद्रियांचा जडा...

हेमंत ऋतूत काय खावे ? काय खाऊ नये

 आला हेमंत ऋतू.... या ऋतूत काय खावे ? काय खाऊ नये ?  *   १. ऋतूचे नाव - हेमंत   २. काळ - ऑक्टोबरचा उत्तरार्ध,  नोव्हेंबर पूर्ण, डिसेंबरचा पूर्वार्ध  ३. दोष प्रकोप - त्रिदोष संतुलीत असतात म्हणूनच याला आरोग्यदायी ऋतू म्हणतात.  ४. योग्य आहार रस - गोड, आंबट, खारट  ५. अयोग्य आहार रस - कडू, तिखट, तुरट  ६. हे खावे -  तूप, लोणी, तेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दूध घातलेली तांदळाची खीर, उडीद, खडी साखर, रबडी, मलई, मध, ऊसाचा रस, हलवा, डाळी, मोड आलेले हरभरे, मोड आलेली कडधान्ये, मूग, गहू, ज्वारी, जुना तांदूळ, आवळा, संत्रे, मिठाई, सुका मेवा, मांसाहार, च्यवनप्राश, मोरावळा, गरम पाणी, गरम अन्न भाजी - पडवळ, वांगी, कोबी, लाल टोमॅटो, गाजर, मटार, पालक  ७. हे खाऊ नये -  कोरडे पदार्थ, आईस्क्रिम, थंड पेय व थंड पदार्थ, चिंच, आमसूल, आंबट दही, आंबा लोणचे, पातळ पदार्थ  ८. हे करावे -   👉 रोज सकाळी ब्रश झाल्यावर चहाच्या चमच्याने अर्धा चमचा हिरडा चूर्ण आणि अर्धा चमचा सुंठ चूर्ण एक कप दुधात उकळून किंवा पाण्यात काढा करुन घ्यावे. 👉 सूर्योदय...

दाताचे आरोग्य

 घरगुती उपचार  🦷 दात  आपले दात म्हणजे आरोग्याचा महामेरूच, जेवण व्यवस्थित चावुन खाल्यास पचन व्यवस्थित होते व पचनशक्ती चांगली असेल तर आरोग्य हे निश्चितच येते. दातांवरील काही समस्येवर घरगुती उपाय सुचवत आहे, करून पहा व निरोगी रहा.  🦷 दातदुखी  - लसणाची पाकळी दाताखाली ठेवल्यास ठणक येऊन दुखत असल्यास थांबते.  - तुळशीची पाने व काळेमिरी एकत्र बारीक करून त्याची गोळी करून दाताखाली दाबून धरल्यास वेदना थांबतात. 🦷 दाताची किडे  - तुळशीच्या पानांचा रस करून त्यात थोडासा कापुर टाकुन ते दातांवर ठेवल्यास किडे मरतात.  - सकाळी अनोश्यापोटी पालक चा रस करून त्याची चुळ भरावी तसेच तो रस थोडा वेळ ठेवुण प्यावा, किडे होत नाहीत !  🦷 पायरिया  - मुळ्याच्या रसाने दिवसातुन ५ वेळेस गुळण्या कराव्या आराम होतो. - पुदिना स्वच्छ धुवुन हळुहळु चावुन खाल्यास त्वरीत आराम मिळतो.  - आवळा चावुन खाल्यास आराम मिळतो.  🦷दातातील किड  - मधाने दाताची हळुहळु मसाज केल्यास किड व दुर्गंधी जाते. - लवंगाची पावडर व लिंबुचा रस एकत्र करून दातांवर लावल्यास किड जाते.  - बाभळीच्य...

कोरोना नंतर घ्यावयाची काळजी

 श्वसनक सन्निपातानंतर ( Covid 19) येणारा थकवा आणि फुफ्फुसांची हानी भरून काढण्यास उपयुक्त आहार:   शाकाहारी व्यक्तींसाठी-  शेवग्याच्या पानांची भाजी/सूप, शेवगा शेंगांची आमटी, लाह्यांचे पाणी वा लापशी, खजूर व कोकम पाण्यात कोळून त्यात मीठ + खडीसाखर घालून घेणे.   मांसाहारी व्यक्तींसाठी-  देशी गायीच्या तुपाची फोडणी दिलेले आणि कमी मसाल्याचे मटण सूप. गेल्या दीड वर्षाच्या प्रत्यक्ष रुग्णानुभवानंतरच अधिकाधिक लोकांना लाभ व्हावा म्हणून जाहीरपणे सांगत आहे. सोबतच आयुर्वेदीय औषधं घेतल्यास अधिक लाभ होईल. करून पहा!  - वैद्य विश्राम माळाकोळीकर  श्रीराम आयुर्वेदिक 7350911888,9420242484 आनंदी रहा, निरोगी रहा!!

सूर्यापासून मिळणारं ऊन आपल्या आरोग्यात महत्त्वाची कामगिरी बजावतं.

 सूर्यापासून मिळणारं ऊन आपल्या आरोग्यात महत्त्वाची कामगिरी बजावतं.         थंडीच्या दिवसांत याचे महत्त्व अधिकच वाढते. कारण हुडहुडी भरणाऱ्या थंडीत उन्हामुळे शरीराला गरम वाटते, पण मनात एक प्रश्न येतोच, उन्हाचा उत्तम फायदा कसा घ्यावा ? याच्या नुकसाना पासून वाचण्यासाठी काय करावं ? सूर्यप्रकाशात असे चमत्कारिक गुण आहेत, ज्यामुळे शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होण्याची शक्‍यता कमी होते. उन्हाच्या सेवनाने शरीरात श्‍वेत रक्त कणांची निर्मिती पुरेशा प्रमाणात होते. जे आजार निर्माण करणाऱ्या कारकांशी लढण्याचे काम करते. आपल्याला तंदुरुस्त ठेवणे. आजार दूर राहतात. सूर्याची किरणं रोगनिवारक आहेत, ज्याच्या सेवनाने आपलं शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. » कर्करोगापासून बचाव : – सूर्यकिरणांमध्ये अँटिकॅन्सखर घटक असतात, जे कर्करोगाचा धोका टाळतात. ज्यांना कर्करोग आहे त्यांना उन्हामुळे आजारात आराम वाटतो. संशोधनांती हे सिद्ध झाले आहे की, जेथे ऊन कमी वेळासाठी असते किंवा ज्या व्यक्ती उन्हात कमी वेळ घालवतात, त्यांना कर्करोग होण्याची शक्‍यता वाढते. » रक्तसंचारात सुधारणा : – रक्तसंचार ...