Posts

Showing posts from November, 2021

ज्येष्ठमध

Image
  ज्येष्ठमध* 1) हे बल्य म्हणजे शक्ती देणारे औषध आहे.      2) कोणत्याही कारणाने येणाऱ्या अशक्तपणावर हे उत्तम औषध आहे. 3) दूध तूप हे बल वाढवते पण कफ वाढतो ज्येष्ठमध बलद औषध आहे तरी कफ कमी करतो.    4) ताकत वाढवण्यासाठी ज्येष्ठमध व मध तुपातून सकाळी व संध्याकाळी जेवणापूर्वी घ्यावा सात ते आठ दिवसात फरक दिसतो. 5) उष्णतेमुळे तोंडास चट्टे पडले असता (वारंवार तोंड येणे) =     20 ग्रॅम ज्येष्ठ मध + 10 ग्रॅम   खडीसाखर एकत्र काढा करून त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून पिणे. 6) आवाज चांगला साफ होण्यास      ज्येष्ठ मध + मिरे यांना त्याच्याच    काढयाने भावना देणे व त्याच्या गोळ्या तोंडात ठेवणे याने बदललेला आवाज सुधारतो व आवाज चांगला होतो. 7) रक्तपित्त तोंडातून / नाकातून घशात फोड येऊन पडणाऱ्या रक्तावर=         जेष्ठमध + हिरडा चूर्ण + मणूका यांचा काढा करावा व त्यामध्ये अडुळशाचा रस तूप व मध एकत्र घालून पिणे. 8) क्षय रोगी याच्या खोकल्यावर जेष्ठमध देण्याचा प्रघात आहे =      सितोपलादि चूर्ण + ज्येष्...

शिंगाडा

  शिंगाडा ( जलकंद, शृंगाटक):-  शिंगाडा पाण्यात उगवणारी वनस्पती आहे.याची वेल असून पाने पाण्यावर तरंगतात. फळे त्रिकोणी आकाराची असतात. त्यांना शिंगाडे म्हणतात. शिंगाडे कच्चे किंवा उकडून खातात. शिंगाडा पौष्टिक असतो. याचे वाळवून पीठ करून लाडू बनवून खातात. उत्तरभारतात, विदर्भात, मध्यप्रदेशातील अनेक तलावांमध्ये शिंगाड्याची शेती केली जाते. शिंगाड्यामध्ये मधुर, शीत, रक्तपित्त, दाह, मेह, अवष्टंभक इ. गुणधर्म असतात.  औषधी उपयोग:-  * अतिसारावर शिंगाड्याचे पीठ ताकात मिसळून द्यावे. * शिंगाड्यामध्ये जीवनसत्व 6 मुबलक प्रमाणात असल्याने  डोळ्यांचा विकारात याच्या सेवनाने फायदा होतो. * शिंगाड्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्याने याच्या सेवनाने हाडे आणि दात मजबूत होतात. * रक्त-पित्तावर शिंगाडे व कचोरा यांचा शिरा करून खावा. * महिलांनी गरोदरपणात शिंगाड्याचे सेवन केल्याने आईचे आरोग्य आणि बाळाचे पोषण चांगले होते. * प्रमेहरोगामध्ये शिंगाडा व जायफळ उगाळून द्यावे. * शिंगाड्यामध्ये फायबर्सचे प्रमाणही भरपूर असल्याने याचे सेवनाने पोट साफ राहते. तसेच मधुमेहातील शुगर, कॅन्सर, हृदयविकार यांच...

सदाफुली- तंबाखु, गुटखा खाण्यामुळे तोंड उघडत नसेल तर त्यावर करा हा उपाय

Image
सदाफुली- तंबाखु, गुटखा खाण्यामुळे तोंड उघडत नसेल तर, त्यावर करा हा उपाय हाताची पाच बोटे एकत्र तोंडामध्ये जाणार..  आपल्यापैकी भरपूर व्यक्ती अश्या असतात की त्यांना तोंड उघडण्याची समस्या असते. ही समस्या प्रामुख्याने ज्या व्यक्ती तं’बाखू ,गु’टखा, ख’र्रा पान मसाला ,सुपारी त्यांचे व्य’सन करतात त्यामुळे आपल्याला तोंड न उघडणे ही समस्या निर्माण होते आणि विशेषतः 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना ही सम’स्या सध्या निर्माण झालेली आहे, त्यात ग्रामीण भागामध्ये ही समस्या खूप जास्त प्रमाणात सध्या निर्माण होत आहे. मित्रांनो गुटखा, तंबाखू यांचे अतिसेवन हे ग्रामीण भागांमध्ये होताना दिसून येते. या आजारांमध्ये व्यवस्थित तोंड उघडता न येणे, पाणी पिता न येणे, तिखट खाता येत नाही किंवा आपल्याला जेवण वगैरे व्यवस्थितरीत्या करता येत नाही.असे म्हणतात मित्रांनो हा आजार म्हणजेच सब म्युकल फायब्रोसिस. तुम्हाला हा आजार झालेला आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे? अशावेळी आपल्याला आपल्या हाताची चार बोटे एकत्र करून आपल्या तोंडामध्ये टाकायचे आहे. जर व्यवस्थित तोंड उघडले नाही तर आपल्याला हा आजार झालेला आहे असे समजायचे. त्याच बरोबर ...

नाडी परीक्षण- आयुर्वेद समज गैरसमज

 नाडी परीक्षण- आयुर्वेद समज गैरसमज  प्रश्न: नाडी परीक्षणाची बलस्थाने आणि व्याप्ती काय आहेत?  उत्तर: रोगाक्रान्त शरीरस्य स्थानान्यष्टौ परीक्षयेत् ।  नाडी मूत्रं मलं जिह्वां शब्दस्पर्शदृगाकृती।।  (योगरत्नाकर)  रुग्णाच्या शरीरातील पुढील आठ स्थानांचे योग्य परीक्षण करावे - नाडी, मल, मूत्र, जीभ, शब्द, स्पर्श, दृष्टी आणि आकृती.  वैद्य नाडी तपासतात म्हणजे नेमकं काय करतात?  - आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. ते मनगटावर नाडी पाहणाऱ्याच्या अनुक्रमे तर्जनी, मध्यमा आणि अनामिका यांवर व्यक्त होत असतात. याच क्रमाने का? जडत्वानुसार! सगळ्यात हलका असलेला वात, मग पित्त आणि सरतेशेवटी सगळ्यात जड कफ. त्यांतही प्रत्येकाचे पाच उपप्रकार लक्षात घेता प्रत्येक बोटाच्या नेमक्या कोणत्या भागावर, कोणत्या वेळी आणि कशा प्रकारचा (अंतर, लय इ.) स्पर्श जाणवतो याचा आढावा घेण्याचं काम आपले वैद्य करतात.  नाडीवरून काय काय लक्षात येतं?  - योग्य दोष योग्य वेळी व्यक्त होत असल्यास प्राकृतावस्था आणि नसल्यास त्या दोषाच्या क्षेत्रात असलेली गडबड! उदा. अपानवायूची नाडी व्य...

आमटीभात... वरणभात... दहीभात... ताकभात... कालवणभात... पिठलंभात... केशरीभात

 क्या #भात है!! ---आमटीभात... वरणभात... दहीभात... ताकभात... कालवणभात... पिठलंभात... केशरीभात... वगैरे सांप्रत काळात भारत देशात डाएट नावाच्या फॅडने  किंवा स्टाईलने भात किंवा तांदूळ ह्या आपल्या लाडक्या आणि आवडत्या अशा पदार्थावर फार मोठी कुरघोडी करायला लावली आहे.  विकेट किपिंग करताना जांभया दिल्याबद्दल पाकिस्तानी कॅप्टन सरफराज अहमद जितका बदनाम झालाय त्यापेक्षा काकणभर जास्तच बदनामी डाएट ह्या प्रकाराने भाताची केलेली आहे. आणि समस्त भारतीयांसाठी ही गोष्ट खचितच महान चिंतेची बाब आहे.  भा  र  त ह्या शब्दाची व्युत्पत्तीच मुळात 'भात जेवण्यात रत असलेल्या लोकांचा देश' अशी व्हायला हवी होती आणि तेच जास्त संयुक्तिक झालं असतं नाही का. ज्या देशाच्या नावातच भात लपलेला आहे अशा लोकांनी भात सोडणे किंवा वजन वाढते म्हणून त्याला त्यागणे म्हणजे ऑस्ट्रेलियाने स्लेजिंगचा त्याग केल्यासारखं होईल.  भारतीय माणसाने आमटी भाताला नाही म्हणणे म्हणजे आमटीभाताचा घोर अपमान, म्हणजे स्टीव्ह बकनरने सचिनला नॉट आऊट देण्यासारखं आहे. बकनरने सचिनला खोटं आऊट देऊन आपलं नाव राखावं आणि आपण आमटीभात जेवून ...

थंडी हिवाळा - आरोग्य टिप्स

 थंडी हिवाळा  - आरोग्य टिप्स सर्दि ताप व्हायरल इन्फेक्षन  खोकला  कफ  घसा दुखने अशा त्रासाला सामोरे  जाव लागत आहे तेव्हा  या सर्व आजारावर खालील उपाय करा व निरोगी रहा👇  1:- आले 2 तुकडे+ १०/१५तुळशीचेपाण + 4/5मिरे + थोडी दालचिनी व एक चमचा जिरे  खोकला असेल तर  3/4लवंग  हे मिक्सर मधे बारीक करून 2 ग्लास  पाणी टाकुन उकळून पाणी एक ग्लास होई पर्यंत ऊकळू द्या 4 भाग करून दिवसात 4 वेळा घ्या कोमट कोमट घ्या त्यात तुम्ही आणखी पाणी अँड करू शकता जर तुम्हची ताप सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्षन बरेच दिवसांनी असेल तर  कडनिंबावरिल गुळवेलाची काडी  यात अॅड करायचा आहे हा उपाय   2 तासात ताप सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्षन गायब होईल  हा प्रयोग 4 दिवस करा  फॅन ac टाळा शक्यतो कोमट पाणी प्या 4 दिवसात 100% बरे व्हाल   सर्दी मुळे  घसा दुखत आहे ? घसा दुखणे  – दूध , हळद व गुळ  याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी  कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते. घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला ...

आमवात (Rheumatoid Arthritis)

आमवात (Rheumatoid Arthritis)  आमवात हा बरा होण्यास खूप वेळ घेणारा आजार आहे..पेशंट आणि डॉक्टर ची सत्वपरीक्षा च म्हणा ना..सतत या आजारामध्ये ups आणि downs येत असतात ..आज पेशंट बरा आहे म्हणेपर्यंत हवामान बदल,खाण्या पिण्यात बदल झाला तर लगेच सांधे दुखायला आणि सुजायला सुरवात होते.. "रोगा: सर्वेपी मंदेग्नो" म्हणजे सगळ्या आजारांचे मूळ कारण हे आयुर्वेदामध्ये अग्निमांद्य सांगितले आहे..अग्नी मंद असेल ,नियमित व्यायाम करत नाही आणि विरुद्ध आहार वरचेवर सेवन यामुळे आमवाताची पाया भरणी होते.. सामान्य लक्षणे १)अंग जड होते २)ताप येतो  ३)भूक मंदावते  ४)पोट साफ होत नाही  ५)सांधे स्पर्शाला गरम लागतात. ६)सांधे सुजतात आणि लाल होतात. ७) अतिशय तीव्र वेदना होतात सांध्याच्या ठिकाणी. आमवातामध्ये वेदना एका सांध्या कडून दुसऱ्या सांध्याकडे संचार करतात.हालचाल खूप मंद होते.  RA Test negative आली म्हणजे आमवात नाही असे म्हणता येणार नाही.लक्षणांवरून आमवात ओळखता येतो.    या आजारात पथ्यापथ्य पाळणे अत्यंत गरजेचे असते.पचायला हलका आहार घ्यावा लागतो..   मोठ्या डाळी,दही,तेलकट पदार्थ ,विरुध्द ...