Posts

जलवायु परिवर्तन को रोकने हमारा दायित्व-

Image
  दोस्तो , क्या आप जलवायु परिवर्तन के बारे में जानते हैं ? क्या आप जानते हैं कि इसका मानव जीवन या संपूर्ण पृथ्वी पर क्या प्रभाव पड़ेगा ? आइए अब जानते हैं... जलवायु परिवर्तन का मानव जीवन या संपूर्ण ग्रह पर क्या प्रभाव पड़ता है - जैसे की, ग्लोबल वार्मिंग से जलवायु परिवर्तन या जलवायु परिवर्तन होता है , पृथ्वी का तापमान बढ़ता है , ग्लेशियर पिघलते हैं और पानी में बदल जाते हैं , और पानी महासागरों में रिस जाता है , जिससे समुद्र का स्तर बढ़ जाता है, जीससे   तटीय गांवों , शहर , कृषि , जंगलों और लोगों को नष्ट कर देगा। यह चेतावणी वैज्ञानिकों के द्वारा दि गयी है। साथ ही , हम कई समस्याओं का सामना करभी रहे हैं ! जैसे कि, बेमौसम बारिश , बाढ़ , सूखा , बारिश की निरंतरता और लोगों के जीवन पर परिणामी प्रभाव। इसके लिए मिलकर काम करना बहुत जरूरी है... क्रमशः..... भाग २ मे.

Godegaon- A Perfect Model of Village Development

Image
Godegaon- A Perfect Model of Development   (Savitribai's photo and the Constitution of India on the Sarpanch's chair) As you can guess from the photo above, there is something really different about the village leaders, which helped the village to emerge as a different model of village development. The chair in the above photo belongs to the sarpanch of Golegaon, on which he has never sat, but on which Savitrimata Phule and the world's most precious book, the Constitution of India, have been placed as a model. Every day inspires the village leaders and villagers to work continuously for the development of the village. I thank to a social worker Shri. Sunil Chavan and Subhash Chavan, who gave the opportunity to see Golegaon. Golegaon is a village in Khultabad taluka of Aurangabad district, with a population of 2459 and approximately 477 families. For the last 20 years, the youth of the village have come together and decided to make the village self-sufficient by developing t...

गोळेगाव - ग्राम विकासाचे अद्भुत मॉडेल

Image
गोळेगाव - ग्राम विकासाचे अद्भुत मॉडेल  (सरपंचाच्या खुर्चीवर सावित्रीबाई आणि भारताचे संविधान) वरील फोटोवरून आपल्याला अंदाज आला असेलच की, या गावातील लोकनेत्यांमध्ये खरच काहीतरी वेगळेपण आहे, ज्यामुळे हे गाव एक ग्राम-विकासाचे एक वेगळे मॉडेल म्हणून उदयास येऊ शकले. वरील फोटोमधील खुर्ची हि गोळेगाव येथील सरपंचांची आहे, ज्यावर ते कधीच बसले नाहीत तर, त्यावर आदर्श म्हणून सावित्रीमाता फुले आणि जगातील अनमोल ग्रंथ भारताचे संविधान ठेवलेले आहे. जे दररोज गावातील लोकनेत्यांना आणि गावकर्यांना गावाच्या विकासाकरिता निरंतर कार्य करण्याकरिता प्रेरणा देत असते. गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि समाज कार्यात अग्रेसर श्री. सुनील चव्हाण आणि सुभाष चव्हाण यांच्या कृपेने गोळेगाव बघण्याचा योगायोग आला. गोळेगाव हे औरंगाबाद जिल्यातील खुलताबाद तालुक्यात, साधारणतः ४७७ परिवार असलेले २४५९ लोकसंखेचे गाव आहे.  २० वर्षापासून गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावाचा विकास करून गावाला स्वयंपूर्ण करायला निश्चय केला होता आणि आज हो निश्चय त्यांनी पूर्णत्वास नेल्याचे दिसून येते. असा निश्चय करण्यास कारण ठरले, ते एका १३-१४ वर्ष वयाच्य...

ज्येष्ठमध

Image
  ज्येष्ठमध* 1) हे बल्य म्हणजे शक्ती देणारे औषध आहे.      2) कोणत्याही कारणाने येणाऱ्या अशक्तपणावर हे उत्तम औषध आहे. 3) दूध तूप हे बल वाढवते पण कफ वाढतो ज्येष्ठमध बलद औषध आहे तरी कफ कमी करतो.    4) ताकत वाढवण्यासाठी ज्येष्ठमध व मध तुपातून सकाळी व संध्याकाळी जेवणापूर्वी घ्यावा सात ते आठ दिवसात फरक दिसतो. 5) उष्णतेमुळे तोंडास चट्टे पडले असता (वारंवार तोंड येणे) =     20 ग्रॅम ज्येष्ठ मध + 10 ग्रॅम   खडीसाखर एकत्र काढा करून त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून पिणे. 6) आवाज चांगला साफ होण्यास      ज्येष्ठ मध + मिरे यांना त्याच्याच    काढयाने भावना देणे व त्याच्या गोळ्या तोंडात ठेवणे याने बदललेला आवाज सुधारतो व आवाज चांगला होतो. 7) रक्तपित्त तोंडातून / नाकातून घशात फोड येऊन पडणाऱ्या रक्तावर=         जेष्ठमध + हिरडा चूर्ण + मणूका यांचा काढा करावा व त्यामध्ये अडुळशाचा रस तूप व मध एकत्र घालून पिणे. 8) क्षय रोगी याच्या खोकल्यावर जेष्ठमध देण्याचा प्रघात आहे =      सितोपलादि चूर्ण + ज्येष्...

शिंगाडा

  शिंगाडा ( जलकंद, शृंगाटक):-  शिंगाडा पाण्यात उगवणारी वनस्पती आहे.याची वेल असून पाने पाण्यावर तरंगतात. फळे त्रिकोणी आकाराची असतात. त्यांना शिंगाडे म्हणतात. शिंगाडे कच्चे किंवा उकडून खातात. शिंगाडा पौष्टिक असतो. याचे वाळवून पीठ करून लाडू बनवून खातात. उत्तरभारतात, विदर्भात, मध्यप्रदेशातील अनेक तलावांमध्ये शिंगाड्याची शेती केली जाते. शिंगाड्यामध्ये मधुर, शीत, रक्तपित्त, दाह, मेह, अवष्टंभक इ. गुणधर्म असतात.  औषधी उपयोग:-  * अतिसारावर शिंगाड्याचे पीठ ताकात मिसळून द्यावे. * शिंगाड्यामध्ये जीवनसत्व 6 मुबलक प्रमाणात असल्याने  डोळ्यांचा विकारात याच्या सेवनाने फायदा होतो. * शिंगाड्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्याने याच्या सेवनाने हाडे आणि दात मजबूत होतात. * रक्त-पित्तावर शिंगाडे व कचोरा यांचा शिरा करून खावा. * महिलांनी गरोदरपणात शिंगाड्याचे सेवन केल्याने आईचे आरोग्य आणि बाळाचे पोषण चांगले होते. * प्रमेहरोगामध्ये शिंगाडा व जायफळ उगाळून द्यावे. * शिंगाड्यामध्ये फायबर्सचे प्रमाणही भरपूर असल्याने याचे सेवनाने पोट साफ राहते. तसेच मधुमेहातील शुगर, कॅन्सर, हृदयविकार यांच...

सदाफुली- तंबाखु, गुटखा खाण्यामुळे तोंड उघडत नसेल तर त्यावर करा हा उपाय

Image
सदाफुली- तंबाखु, गुटखा खाण्यामुळे तोंड उघडत नसेल तर, त्यावर करा हा उपाय हाताची पाच बोटे एकत्र तोंडामध्ये जाणार..  आपल्यापैकी भरपूर व्यक्ती अश्या असतात की त्यांना तोंड उघडण्याची समस्या असते. ही समस्या प्रामुख्याने ज्या व्यक्ती तं’बाखू ,गु’टखा, ख’र्रा पान मसाला ,सुपारी त्यांचे व्य’सन करतात त्यामुळे आपल्याला तोंड न उघडणे ही समस्या निर्माण होते आणि विशेषतः 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना ही सम’स्या सध्या निर्माण झालेली आहे, त्यात ग्रामीण भागामध्ये ही समस्या खूप जास्त प्रमाणात सध्या निर्माण होत आहे. मित्रांनो गुटखा, तंबाखू यांचे अतिसेवन हे ग्रामीण भागांमध्ये होताना दिसून येते. या आजारांमध्ये व्यवस्थित तोंड उघडता न येणे, पाणी पिता न येणे, तिखट खाता येत नाही किंवा आपल्याला जेवण वगैरे व्यवस्थितरीत्या करता येत नाही.असे म्हणतात मित्रांनो हा आजार म्हणजेच सब म्युकल फायब्रोसिस. तुम्हाला हा आजार झालेला आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे? अशावेळी आपल्याला आपल्या हाताची चार बोटे एकत्र करून आपल्या तोंडामध्ये टाकायचे आहे. जर व्यवस्थित तोंड उघडले नाही तर आपल्याला हा आजार झालेला आहे असे समजायचे. त्याच बरोबर ...

नाडी परीक्षण- आयुर्वेद समज गैरसमज

 नाडी परीक्षण- आयुर्वेद समज गैरसमज  प्रश्न: नाडी परीक्षणाची बलस्थाने आणि व्याप्ती काय आहेत?  उत्तर: रोगाक्रान्त शरीरस्य स्थानान्यष्टौ परीक्षयेत् ।  नाडी मूत्रं मलं जिह्वां शब्दस्पर्शदृगाकृती।।  (योगरत्नाकर)  रुग्णाच्या शरीरातील पुढील आठ स्थानांचे योग्य परीक्षण करावे - नाडी, मल, मूत्र, जीभ, शब्द, स्पर्श, दृष्टी आणि आकृती.  वैद्य नाडी तपासतात म्हणजे नेमकं काय करतात?  - आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. ते मनगटावर नाडी पाहणाऱ्याच्या अनुक्रमे तर्जनी, मध्यमा आणि अनामिका यांवर व्यक्त होत असतात. याच क्रमाने का? जडत्वानुसार! सगळ्यात हलका असलेला वात, मग पित्त आणि सरतेशेवटी सगळ्यात जड कफ. त्यांतही प्रत्येकाचे पाच उपप्रकार लक्षात घेता प्रत्येक बोटाच्या नेमक्या कोणत्या भागावर, कोणत्या वेळी आणि कशा प्रकारचा (अंतर, लय इ.) स्पर्श जाणवतो याचा आढावा घेण्याचं काम आपले वैद्य करतात.  नाडीवरून काय काय लक्षात येतं?  - योग्य दोष योग्य वेळी व्यक्त होत असल्यास प्राकृतावस्था आणि नसल्यास त्या दोषाच्या क्षेत्रात असलेली गडबड! उदा. अपानवायूची नाडी व्य...

आमटीभात... वरणभात... दहीभात... ताकभात... कालवणभात... पिठलंभात... केशरीभात

 क्या #भात है!! ---आमटीभात... वरणभात... दहीभात... ताकभात... कालवणभात... पिठलंभात... केशरीभात... वगैरे सांप्रत काळात भारत देशात डाएट नावाच्या फॅडने  किंवा स्टाईलने भात किंवा तांदूळ ह्या आपल्या लाडक्या आणि आवडत्या अशा पदार्थावर फार मोठी कुरघोडी करायला लावली आहे.  विकेट किपिंग करताना जांभया दिल्याबद्दल पाकिस्तानी कॅप्टन सरफराज अहमद जितका बदनाम झालाय त्यापेक्षा काकणभर जास्तच बदनामी डाएट ह्या प्रकाराने भाताची केलेली आहे. आणि समस्त भारतीयांसाठी ही गोष्ट खचितच महान चिंतेची बाब आहे.  भा  र  त ह्या शब्दाची व्युत्पत्तीच मुळात 'भात जेवण्यात रत असलेल्या लोकांचा देश' अशी व्हायला हवी होती आणि तेच जास्त संयुक्तिक झालं असतं नाही का. ज्या देशाच्या नावातच भात लपलेला आहे अशा लोकांनी भात सोडणे किंवा वजन वाढते म्हणून त्याला त्यागणे म्हणजे ऑस्ट्रेलियाने स्लेजिंगचा त्याग केल्यासारखं होईल.  भारतीय माणसाने आमटी भाताला नाही म्हणणे म्हणजे आमटीभाताचा घोर अपमान, म्हणजे स्टीव्ह बकनरने सचिनला नॉट आऊट देण्यासारखं आहे. बकनरने सचिनला खोटं आऊट देऊन आपलं नाव राखावं आणि आपण आमटीभात जेवून ...

थंडी हिवाळा - आरोग्य टिप्स

 थंडी हिवाळा  - आरोग्य टिप्स सर्दि ताप व्हायरल इन्फेक्षन  खोकला  कफ  घसा दुखने अशा त्रासाला सामोरे  जाव लागत आहे तेव्हा  या सर्व आजारावर खालील उपाय करा व निरोगी रहा👇  1:- आले 2 तुकडे+ १०/१५तुळशीचेपाण + 4/5मिरे + थोडी दालचिनी व एक चमचा जिरे  खोकला असेल तर  3/4लवंग  हे मिक्सर मधे बारीक करून 2 ग्लास  पाणी टाकुन उकळून पाणी एक ग्लास होई पर्यंत ऊकळू द्या 4 भाग करून दिवसात 4 वेळा घ्या कोमट कोमट घ्या त्यात तुम्ही आणखी पाणी अँड करू शकता जर तुम्हची ताप सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्षन बरेच दिवसांनी असेल तर  कडनिंबावरिल गुळवेलाची काडी  यात अॅड करायचा आहे हा उपाय   2 तासात ताप सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्षन गायब होईल  हा प्रयोग 4 दिवस करा  फॅन ac टाळा शक्यतो कोमट पाणी प्या 4 दिवसात 100% बरे व्हाल   सर्दी मुळे  घसा दुखत आहे ? घसा दुखणे  – दूध , हळद व गुळ  याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी  कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते. घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला ...

आमवात (Rheumatoid Arthritis)

आमवात (Rheumatoid Arthritis)  आमवात हा बरा होण्यास खूप वेळ घेणारा आजार आहे..पेशंट आणि डॉक्टर ची सत्वपरीक्षा च म्हणा ना..सतत या आजारामध्ये ups आणि downs येत असतात ..आज पेशंट बरा आहे म्हणेपर्यंत हवामान बदल,खाण्या पिण्यात बदल झाला तर लगेच सांधे दुखायला आणि सुजायला सुरवात होते.. "रोगा: सर्वेपी मंदेग्नो" म्हणजे सगळ्या आजारांचे मूळ कारण हे आयुर्वेदामध्ये अग्निमांद्य सांगितले आहे..अग्नी मंद असेल ,नियमित व्यायाम करत नाही आणि विरुद्ध आहार वरचेवर सेवन यामुळे आमवाताची पाया भरणी होते.. सामान्य लक्षणे १)अंग जड होते २)ताप येतो  ३)भूक मंदावते  ४)पोट साफ होत नाही  ५)सांधे स्पर्शाला गरम लागतात. ६)सांधे सुजतात आणि लाल होतात. ७) अतिशय तीव्र वेदना होतात सांध्याच्या ठिकाणी. आमवातामध्ये वेदना एका सांध्या कडून दुसऱ्या सांध्याकडे संचार करतात.हालचाल खूप मंद होते.  RA Test negative आली म्हणजे आमवात नाही असे म्हणता येणार नाही.लक्षणांवरून आमवात ओळखता येतो.    या आजारात पथ्यापथ्य पाळणे अत्यंत गरजेचे असते.पचायला हलका आहार घ्यावा लागतो..   मोठ्या डाळी,दही,तेलकट पदार्थ ,विरुध्द ...

कोमट पाणी पिण्याचे फायदे

 कोमट पाणी पिण्याचे फायदे, बरेच रोग होतात दूर  सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घाण साफ होते. कोमट पाणी पिण्यामुळे, शरीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते. जाणून घ्या फायदे. आपले शरीर बहुतांश पाण्याने बनलेले आहे. जर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर बरेच रोग शरीरात घर करू लागतात, याचाच अर्थ पाणी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. कोमट पाणी एक औषध म्हणून कार्य करते. बहुतेक लोक दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करतात, जेणेकरून शरीराला ताजेतवाने वाटेल. त्याच वेळी, पाणी पिताना, सामान्य किंवा थंड पाणी पितात. आयुर्वेदानुसार हे चुकीचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सर्दी पडश्यात लाभदायक सर्दी झाल्यावर कोमट पाणी पिण्याने कफ वितळतो. दिवसातून तीन किंवा चार वेळा कोमट पाणी घेतल्यास थंडीत आराम मिळेल. कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्याने देखील खोकला बरा होऊ शकतो. कोमट पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्याचा व...

खोकला घरगुती उपाय

 घरगुती उपचार  खोकला  ज्यांना खुप जास्त खोकला येत असेल औषधांनी तेवढ्यापुरता थांबुन परत - परत तोच त्रास होत त्यांनी हा उपाय करायला हरकत नाही गुण येईल.  अगदी थोडी हळद पावडर तोंडाच्या एकदम आत मध्ये जे छोटेसे मांसाचे लोलक असते त्यास लावावी, चटकवावी. हाताने शक्य नसेल तर छोट्या चमचीस तुप लावुन त्या चमचीस हळद पावडर लावा व त्याने केले तरी चालते, दिवसातून तीन तार वेळेस लावले तर उत्तम, लाभ त्वरीत होतो.  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

चहा

 चहा ☕ मग सकाळी उठल्यावर चहा प्यावा की नाही ?   अगदी सकाळी उठल्यावर तोडं धुतले की  लगेचच चहाची गरजही नसतेच !  वास्तविक रिकाम्यापोटी घेतलेला चहा  हा काही वेळाने लागणार्या भूकेलाही नाहीशी करतो.  म्हणजेच चहा प्यायचा टाळला  तर नाष्ट्याची भूक कडकडून लागते.  हा अनुभव प्रत्येकाने घेतला तरच कळतो…  चहा न घेता तसेच राहीले असता..  पित्ताचा काळ हा सकाळी १० ते दुपारी २ असल्याने  ह्या काळात चांगली भूक लागते.  चहा हे पेय शीतप्रदेशाचे पेय आहे.  थंड प्रदेशात गारठा कमी व्हावा म्हणून  चहा/कॉफी पाना ची पद्धती आहे.  ▪ आपल्याकडे फारतर पावसाळ्यात व हिवाळ्यात चहा/कॉफी प्यायला हरकत नाही परंतु तो गोदुग्ध युक्त असावा.  ▪अति तुरट किंवा कडू रसात्मक असा नसावा.  ▪परंतु जे पित्तज प्रकृती आहेत, ज्यांना पित्ताचे विकार संभवतात त्यांनी चहा शक्यतो अतिप्रमाणात टाळावा.  त्यांना ऐवजी गोदुग्ध + गोघॄत (गाईचे तूप) + साखर घ्यायला हवे. ▪ चहा बनवताना त्यात सुंठ व वेलची पावडर टाकावी म्हणजे पचनास मदत होते,  पित्त वाढत नाही व इंद्रियांचा जडा...

हेमंत ऋतूत काय खावे ? काय खाऊ नये

 आला हेमंत ऋतू.... या ऋतूत काय खावे ? काय खाऊ नये ?  *   १. ऋतूचे नाव - हेमंत   २. काळ - ऑक्टोबरचा उत्तरार्ध,  नोव्हेंबर पूर्ण, डिसेंबरचा पूर्वार्ध  ३. दोष प्रकोप - त्रिदोष संतुलीत असतात म्हणूनच याला आरोग्यदायी ऋतू म्हणतात.  ४. योग्य आहार रस - गोड, आंबट, खारट  ५. अयोग्य आहार रस - कडू, तिखट, तुरट  ६. हे खावे -  तूप, लोणी, तेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दूध घातलेली तांदळाची खीर, उडीद, खडी साखर, रबडी, मलई, मध, ऊसाचा रस, हलवा, डाळी, मोड आलेले हरभरे, मोड आलेली कडधान्ये, मूग, गहू, ज्वारी, जुना तांदूळ, आवळा, संत्रे, मिठाई, सुका मेवा, मांसाहार, च्यवनप्राश, मोरावळा, गरम पाणी, गरम अन्न भाजी - पडवळ, वांगी, कोबी, लाल टोमॅटो, गाजर, मटार, पालक  ७. हे खाऊ नये -  कोरडे पदार्थ, आईस्क्रिम, थंड पेय व थंड पदार्थ, चिंच, आमसूल, आंबट दही, आंबा लोणचे, पातळ पदार्थ  ८. हे करावे -   👉 रोज सकाळी ब्रश झाल्यावर चहाच्या चमच्याने अर्धा चमचा हिरडा चूर्ण आणि अर्धा चमचा सुंठ चूर्ण एक कप दुधात उकळून किंवा पाण्यात काढा करुन घ्यावे. 👉 सूर्योदय...

दाताचे आरोग्य

 घरगुती उपचार  🦷 दात  आपले दात म्हणजे आरोग्याचा महामेरूच, जेवण व्यवस्थित चावुन खाल्यास पचन व्यवस्थित होते व पचनशक्ती चांगली असेल तर आरोग्य हे निश्चितच येते. दातांवरील काही समस्येवर घरगुती उपाय सुचवत आहे, करून पहा व निरोगी रहा.  🦷 दातदुखी  - लसणाची पाकळी दाताखाली ठेवल्यास ठणक येऊन दुखत असल्यास थांबते.  - तुळशीची पाने व काळेमिरी एकत्र बारीक करून त्याची गोळी करून दाताखाली दाबून धरल्यास वेदना थांबतात. 🦷 दाताची किडे  - तुळशीच्या पानांचा रस करून त्यात थोडासा कापुर टाकुन ते दातांवर ठेवल्यास किडे मरतात.  - सकाळी अनोश्यापोटी पालक चा रस करून त्याची चुळ भरावी तसेच तो रस थोडा वेळ ठेवुण प्यावा, किडे होत नाहीत !  🦷 पायरिया  - मुळ्याच्या रसाने दिवसातुन ५ वेळेस गुळण्या कराव्या आराम होतो. - पुदिना स्वच्छ धुवुन हळुहळु चावुन खाल्यास त्वरीत आराम मिळतो.  - आवळा चावुन खाल्यास आराम मिळतो.  🦷दातातील किड  - मधाने दाताची हळुहळु मसाज केल्यास किड व दुर्गंधी जाते. - लवंगाची पावडर व लिंबुचा रस एकत्र करून दातांवर लावल्यास किड जाते.  - बाभळीच्य...

कोरोना नंतर घ्यावयाची काळजी

 श्वसनक सन्निपातानंतर ( Covid 19) येणारा थकवा आणि फुफ्फुसांची हानी भरून काढण्यास उपयुक्त आहार:   शाकाहारी व्यक्तींसाठी-  शेवग्याच्या पानांची भाजी/सूप, शेवगा शेंगांची आमटी, लाह्यांचे पाणी वा लापशी, खजूर व कोकम पाण्यात कोळून त्यात मीठ + खडीसाखर घालून घेणे.   मांसाहारी व्यक्तींसाठी-  देशी गायीच्या तुपाची फोडणी दिलेले आणि कमी मसाल्याचे मटण सूप. गेल्या दीड वर्षाच्या प्रत्यक्ष रुग्णानुभवानंतरच अधिकाधिक लोकांना लाभ व्हावा म्हणून जाहीरपणे सांगत आहे. सोबतच आयुर्वेदीय औषधं घेतल्यास अधिक लाभ होईल. करून पहा!  - वैद्य विश्राम माळाकोळीकर  श्रीराम आयुर्वेदिक 7350911888,9420242484 आनंदी रहा, निरोगी रहा!!

सूर्यापासून मिळणारं ऊन आपल्या आरोग्यात महत्त्वाची कामगिरी बजावतं.

 सूर्यापासून मिळणारं ऊन आपल्या आरोग्यात महत्त्वाची कामगिरी बजावतं.         थंडीच्या दिवसांत याचे महत्त्व अधिकच वाढते. कारण हुडहुडी भरणाऱ्या थंडीत उन्हामुळे शरीराला गरम वाटते, पण मनात एक प्रश्न येतोच, उन्हाचा उत्तम फायदा कसा घ्यावा ? याच्या नुकसाना पासून वाचण्यासाठी काय करावं ? सूर्यप्रकाशात असे चमत्कारिक गुण आहेत, ज्यामुळे शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होण्याची शक्‍यता कमी होते. उन्हाच्या सेवनाने शरीरात श्‍वेत रक्त कणांची निर्मिती पुरेशा प्रमाणात होते. जे आजार निर्माण करणाऱ्या कारकांशी लढण्याचे काम करते. आपल्याला तंदुरुस्त ठेवणे. आजार दूर राहतात. सूर्याची किरणं रोगनिवारक आहेत, ज्याच्या सेवनाने आपलं शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. » कर्करोगापासून बचाव : – सूर्यकिरणांमध्ये अँटिकॅन्सखर घटक असतात, जे कर्करोगाचा धोका टाळतात. ज्यांना कर्करोग आहे त्यांना उन्हामुळे आजारात आराम वाटतो. संशोधनांती हे सिद्ध झाले आहे की, जेथे ऊन कमी वेळासाठी असते किंवा ज्या व्यक्ती उन्हात कमी वेळ घालवतात, त्यांना कर्करोग होण्याची शक्‍यता वाढते. » रक्तसंचारात सुधारणा : – रक्तसंचार ...

तीळाचे महत्त्व

  तीळाचे महत्त्व सामान्यता जवळपास प्रत्येकाच्या शरिरावर तीळ असतात, परंतु आपणांस माहित आहे का !? तीळ शरिरावर कुठे असल्यास त्याचा काय परिणाम असतो !? तीळ हे माणसाच्या प्रारब्ध व भविष्यावर आधारित एक नैसर्गिक देण आहे. तर आज आपण काही सामान्य ज्ञानांची माहिती घेऊया.  शरिरावर कुठे तीळ असल्यावर त्याचा मनुष्याचा स्वभावावर व जीवनावर काय परिणाम होतो हे बघुया.  १) मानेपासुन वर चेहर्यावर तीळ असल्यास ती व्यक्ती शांत, हुशार, संयमी व कोणत्याही परिस्थितीत स्वताला व परिवाराला त्यातुन धैर्याने बाहेर काढते. २) मानेवर तीळ असल्यास बोलण्यात हुशार व समोरच्यावर प्रभाव टाकु शकणारी. ३) मानेपासुन कमरेपर्यंत पुढील भागांत कोठेही तीळ असल्यास ती व्यक्ती परिवारातील प्रिय तसेच सदैव हसतमुख आणि सर्वांना एकत्र करणारी व्यक्ती ठरते.  ४) पाठीवर तीळ असल्यास ती व्यक्ती स्वाभिमानाने राहणारी, परिस्थितीशी जुळवुन घेणारी, पण स्वताचे खरे करणारी असते.  ५) कमरेपासुन खाली पायांच्या पंज्यापर्यंत तीळ असल्यास मनाने अतिशय निर्मळ पण रागीट, सदैव दुसर्याचे चांगले करण्यासाठी तत्पर, कोणतेही कार्य करण्यास समर्थ असते. ...

झाडांची उपयोगिता

 काही उपयुक्त माहिती  आपल्या घराच्या जवळपास अनेक प्रकारची झाडे, वनस्पती, फुलांची झाडे येतात किंवा आपण लावतो, त्या प्रत्येक झाडाचे स्वताचे काही गुणधर्म असतात, काहींचे गुणधर्म हे अत्यंत उपयुक्त असतात, काहींचे सामान्य तर काही आपण स्वताहुन लावु नयेत असे असतात, कारण प्रत्येक झाड चांगले असतेच पण त्यांच्या प्रत्येकाच्या मान-मर्यादा व त्यांची उपयोगिता असतात, कळत - नकळत जर ते पाळले गेले नाही किंवा उपयोग चुकला तर जीवनात रोगराई, मानहानी, धनहानी, परिवारीक मतभेद येतात.  कोणतेही झाड तोडु नयेत पण त्याने स्वताचे व आरोग्याचे संरक्षण कसे करावे, व ते उपयोगात कसे आणावे ते बघुया.  🌿 तुळस - अत्यंत बहुगुणी, अत्यंत उपयुक्त  🌿 पिंपळ - घरा भोवती स्वता लावु नये पण आले असल्यास त्यास पिवळा धागा बांधावा.  🌿 वड - घरा भोवती लावु नये पण आले असल्यास त्यास सफेद धागा बांधावा.  🌿 औदुंबर - घरा भोवती लावु नये पण आले असल्यास त्यास पिवळा धागा बांधावा.  🌿 कडुलिंब - उपयुक्त बहुगुणी आहे. महिन्यातून किमान एकदा त्याचा रस प्यावा.  🌿 शेरा चे काटेरी झाड नसावे, त्याच्या चिकाने सुज येते...

क्रियेटीनीन लेव्हल मध्ये ठेवण्यासाठी उपाययोजना

  क्रियेटीनीन लेव्हल मध्ये ठेवण्यासाठी उपाययोजना. किडनी संबधीत आजारात हे प्रमाण वाढले की किडनी फेल्युअरचा धोका तयार होतो यासाठी उपाययोजना १) मक्याच्या केसांना रोज उकळून ते पाणी कपभर प्या. २) कोथिंबीर रस घ्या. ३) कोबीचा रस घ्या. ४) दालचिनी पावडरचा काढा एक चमचा मध घालून घेणे. ६) पाणी भरपूर पिणे, (३ ते ४ लिटर) ७) हलका व्यायाम करणे. ८) मासाहार टाळावा. ९) केमोमाईनच्या पानांचा काढा घेणे १०) नेटल लीफ टी घेणे. ११) मुळ्याच्या पानांचा रस एक चमचा घ्या. (रोज) १२) रोज उशीरासव घेणे तीन वेळा दोन चमचे समभाग पाण्यात. १३) चंद्रप्रभा वटी व मुत्रदोष नाशक वटी घेणे. १४) ब्राम्ही च्या पानांचा रस व काळीमिरी एकत्र घेणे. १५) जेवणातील प्रोटीन मात्रा बंद करून प्रोटीन फ्री डायट देणे. १६) उच्च रक्तदाब कंट्रोल मध्ये आणणे. १७) नशा, चहा, काँफी बंद करणे. १८) पुनर्नवासव घेणे. ( ९ व १० मध्ये नमूद केलेली केमोमाईन व नेटल लिफ ही झाडे नर्सरीतून मिळतील) किडनीचे आजार.  किडनी फेल्युअर विकारांवर अथवा किडनी अंशतः काम करते किंवा डायलेसिस सुरू असलेली मंडळी ही हे उपाय करु शकतात. ही संपुर्ण पणे आयुर्वेदिक पध्दती असून याचे सा...